श्रीमद्भागवत गीता | अध्याय १८ (मोक्षसंन्यास योग) | Srimadbhagavata Gita | Adhyay 18 (Mokshasannyas yog) maulimajhi-blogger

shreyash feed ads 2

श्रीमद्भागवत गीता | अध्याय १८  (मोक्षसंन्यास योग) | Srimadbhagavata Gita | Adhyay 18 (Mokshasannyas yog) maulimajhi-blogger

|| मोक्षसंन्यास योग ||

माझी माऊली अँप डाउनलोड करा 👉  Download

माझी माऊली whatsapp ग्रुप मध्ये सामील व्हा👉🏻 Join 













श्रीमद्‌भगवद्‌गीता : अठरावा अध्याय (मोक्षसंन्यासयोग)
मूळ अठराव्या अध्यायाचा प्रारंभ)
अथाष्टादशोऽध्याय:)

अर्जुन उवाच:
संन्यासस्य महाबाहो तत्त्वमिच्छामि वेदितुम्‌ ।
त्यागस्य च हृषीकेश पृथक्केशिनिषूदन ॥ १८-१ ॥

श्रीभगवानुवाच:
काम्यानां कर्माणां न्यासं संन्यासं कवयो विदुः ।
सर्वकर्मफलत्यागं प्राहुस्त्यागं विचक्षणाः ॥ १८-२ ॥

त्याज्यं दोषवदित्येके कर्म प्राहुर्मनीषिणः ।
यज्ञदानतपःकर्म न त्याज्यमिति चापरे ॥ १८-३ ॥

निश्चयं शृणु मे तत्र त्यागे भरतसत्तम ।
त्यागो हि पुरुषव्याघ्र त्रिविधः सम्प्रकीर्तितः ॥ १८-४ ॥

यज्ञदानतपःकर्म न त्याज्यं कार्यमेव तत्‌ ।
यज्ञो दानं तपश्चैव पावनानि मनीषिणाम्‌ ॥ १८-५ ॥

एतान्यपि तु कर्माणि सङ्गं त्यक्त्वा फलानि च ।
कर्तव्यानीति मे पार्थ निश्चितं मतमुत्तमम्‌ ॥ १८-६ ॥

नियतस्य तु संन्यासः कर्मणो नोपपद्यते ।
मोहात्तस्य परित्यागस्तामसः परिकीर्तितः ॥ १८-७ ॥

दुःखमित्येव यत्कर्म कायक्लेशभयात्त्यजेत्‌ ।
स कृत्वा राजसं त्यागं नैव त्यागफलं लभेत्‌ ॥ १८-८ ॥

कार्यमित्येव यत्कर्म नियतं क्रियतेऽर्जुन ।
सङ्गं त्यक्त्वा फलं चैव स त्यागः सात्त्विको मतः ॥ १८-९ ॥

न द्वेष्ट्यकुशलं कर्म कुशले नानुषज्जते ।
त्यागी सत्त्वसमाविष्टो मेधावी छिन्नसंशयः ॥ १८-१० ॥

न हि देहभृता शक्यं त्यक्तुं कर्माण्यशेषतः ।
यस्तु कर्मफलत्यागी स त्यागीत्यभिधीयते ॥ १८-११ ॥

अनिष्टमिष्टं मिश्रं च त्रिविधं कर्मणः फलम्‌ ।
भवत्यत्यागिनां प्रेत्य न तु संन्यासिनां क्वचित्‌ ॥ १८-१२ ॥

पञ्चैतानि महाबाहो कारणानि निबोध मे ।
साङ्ख्ये कृतान्ते प्रोक्तानि सिद्धये सर्वकर्मणाम्‌ ॥ १८-१३ ॥

अधिष्ठानं तथा कर्ता करणं च पृथग्विधम्‌ ।
विविधाश्च पृथक्चेष्टा दैवं चैवात्र पञ्चमम्‌ ॥ १८-१४ ॥

शरीरवाङ्‍मनोभिर्यत्कर्म प्रारभते नरः ।
न्याय्यं वा विपरीतं वा पञ्चैते तस्य हेतवः ॥ १८-१५ ॥

तत्रैवं सति कर्तारमात्मानं केवलं तु यः ।
पश्यत्यकृतबुद्धित्वान्न स पश्यति दुर्मतिः ॥ १८-१६ ॥

यस्य नाहङ्कृतो भावो बुद्धिर्यस्य न लिप्यते ।
हत्वापि स इमाँल्लोकान्न हन्ति न निबध्यते ॥ १८-१७ ॥

ज्ञानं ज्ञेयं परिज्ञाता त्रिविधा कर्मचोदना ।
करणं कर्म कर्तेति त्रिविधः कर्मसंग्रहः ॥ १८-१८ ॥

ज्ञानं कर्म च कर्ता च त्रिधैव गुणभेदतः ।
प्रोच्यते गुणसङ्ख्याने यथावच्छृणु तान्यपि ॥ १८-१९ ॥

सर्वभूतेषु येनैकं भावमव्ययमीक्षते ।
अविभक्तं विभक्तेषु तज्ज्ञानं विद्धि सात्त्विकम्‌ ॥ १८-२० ॥

पृथक्त्वेन तु यज्ज्ञानं नानाभावान्पृथग्विधान्‌ ।
वेत्ति सर्वेषु भूतेषु तज्ज्ञानं विद्धि राजसम्‌ ॥ १८-२१ ॥

यत्तु कृत्स्नवदेकस्मिन्कार्ये सक्तमहैतुकम्‌ ।
अतत्त्वार्थवदल्पं च तत्तामसमुदाहृतम्‌ ॥ १८-२२ ॥

नियतं सङ्गरहितमरागद्वेषतः कृतम्‌ ।
अफलप्रेप्सुना कर्म यत्तत्सात्त्विकमुच्यते ॥ १८-२३ ॥

यत्तु कामेप्सुना कर्म साहङ्कारेण वा पुनः ।
क्रियते बहुलायासं तद्राजसमुदाहृतम्‌ ॥ १८-२४ ॥

अनुबन्धं क्षयं हिंसामनवेक्ष्य च पौरुषम्‌ ।
मोहादारभ्यते कर्म यत्तत्तामसमुच्यते ॥ १८-२५ ॥

मुक्तसङ्गोऽनहंवादी धृत्युत्साहसमन्वितः ।
सिद्ध्यसिद्ध्योर्निर्विकारः कर्ता सात्त्विक उच्यते ॥ १८-२६ ॥

रागी कर्मफलप्रेप्सुर्लुब्धो हिंसात्मकोऽशुचिः ।
हर्षशोकान्वितः कर्ता राजसः परिकीर्तितः ॥ १८-२७ ॥

अयुक्तः प्राकृतः स्तब्धः शठो नैष्कृतिकोऽलसः ।
विषादी दीर्घसूत्री च कर्ता तामस उच्यते ॥ १८-२८ ॥

बुद्धेर्भेदं धृतेश्चैव गुणतस्त्रिविधं शृणु ।
प्रोच्यमानमशेषेण पृथक्त्वेन धनञ्जय ॥ १८-२९ ॥

प्रवृत्तिं च निवृत्तिं च कार्याकार्ये भयाभये ।
बन्धं मोक्षं च या वेत्ति बुद्धिः सा पार्थ सात्त्विकी ॥ १८-३० ॥

यया धर्ममधर्मं च कार्यं चाकार्यमेव च ।
अयथावत्प्रजानाति बुद्धिः सा पार्थ राजसी ॥ १८-३१ ॥

अधर्मं धर्ममिति या मन्यसे तमसावृता ।
सर्वार्थान्विपरीतांश्च बुद्धिः सा पार्थ तामसी ॥ १८-३२ ॥

धृत्या यया धारयते मनःप्राणेन्द्रियक्रियाः ।
योगोनाव्यभिचारिण्या धृतिः सा पार्थ सात्त्विकी ॥ १८-३३ ॥

यया तु धर्मकामार्थान्धृत्या धारयतेऽर्जुन ।
प्रसङ्गेन फलाकाङ्क्षी धृतिः सा पार्थ राजसी ॥ १८-३४ ॥

यया स्वप्नं भयं शोकं विषादं मदमेव च ।
न विमुञ्चति दुर्मेधा धृतिः सा पार्थ तामसी ॥ १८-३५ ॥

सुखं त्विदानीं त्रिविधं शृणु मे भरतर्षभ ।
अभ्यासाद्रमते यत्र दुःखान्तं च निगच्छति ॥ १८-३६ ॥

यत्तदग्रे विषमिव परिणामेऽमृतोपमम्‌ ।
तत्सुखं सात्त्विकं प्रोक्तमात्मबुद्धिप्रसादजम्‌ ॥ १८-३७ ॥

विषयेन्द्रियसंयोगाद्यत्तदग्रेऽमृतोपमम्‌ ।
परिणामे विषमिव तत्सुखं राजसं स्मृतम्‌ ॥ १८-३८ ॥

यदग्रे चानुबन्धे च सुखं मोहनमात्मनः ।
निद्रालस्यप्रमादोत्थं तत्तामसमुदाहृतम्‌ ॥ १८-३९ ॥

न तदस्ति पृथिव्यां वा दिवि देवेषु व पुनः ।
सत्त्वं प्रकृतिजैर्मुक्तं यदेभिः स्यात्त्रिभिर्गुणैः ॥ १८-४० ॥

ब्राह्मणक्षत्रियविशां शूद्राणां च परन्तप ।
कर्माणि प्रविभक्तानि स्वभावप्रभवैर्गुणैः ॥ १८-४१ ॥

शमो दमस्तपः शौचं क्षान्तिरार्जवमेव च ।
ज्ञानं विज्ञानमास्तिक्यं ब्रह्मकर्म स्वभावजम्‌ ॥ १८-४२ ॥

शौर्यं तेजो धृतिर्दाक्ष्यं युद्धे चाप्यपलायनम्‌ ।
दानमीश्वरभावश्च क्षात्रं कर्म स्वभावजम्‌ ॥ १८-४३ ॥

कृषिगौरक्ष्यवाणिज्यं वैश्यकर्म स्वभावजम्‌ ।
परिचर्यात्मकं कर्म शूद्रस्यापि स्वभावजम्‌ ॥ १८-४४ ॥

स्वे स्वे कर्मण्यभिरतः संसिद्धिं लभते नरः ।
स्वकर्मनिरतः सिद्धिं यथा विन्दति तच्छृणु ॥ १८-४५ ॥

यतः प्रवृत्तिर्भूतानां येन सर्वमिदं ततम्‌ ।
स्वकर्मणा तमभ्यर्च्य सिद्धिं विन्दति मानवः ॥ १८-४६ ॥

श्रेयान्स्वधर्मो विगुणः परधर्मात्स्वनुष्ठितात्‌ ।
स्वभावनियतं कर्म कुर्वन्नाप्नोति किल्बिषम्‌ ॥ १८-४७ ॥

सहजं कर्म कौन्तेय सदोषमपि न त्यजेत्‌ ।
सर्वारम्भा हि दोषेण धूमेनाग्निरिवावृताः ॥ १८-४८ ॥

असक्तबुद्धिः सर्वत्र जितात्मा विगतस्पृहः ।
नैष्कर्म्यसिद्धिं परमां संन्यासेनाधिगच्छति ॥ १८-४९ ॥

सिद्धिं प्राप्तो यथा ब्रह्म तथाप्नोति निबोध मे ।
समासेनैव कौन्तेय निष्ठा ज्ञानस्य या परा ॥ १८-५० ॥

द्ध्या विशुद्ध्या युक्तो धृत्यात्मानं नियम्य च ।
शब्दादीन्विषयांस्त्यक्त्वा रागद्वेषौ व्युदस्य च ॥ १८-५१ ॥

विविक्तसेवी लघ्वाशी यतवाक्कायमानसः ।
ध्यानयोगपरो नित्यं वैराग्यं समुपाश्रितः ॥ १८-५२ ॥

अहङ्कारं बलं दर्पं कामं क्रोधं परिग्रहम्‌ ।
विमुच्य निर्ममः शान्तो ब्रह्मभूयाय कल्पते ॥ १८-५३ ॥

ब्रह्मभूतः प्रसन्नात्मा न शोचति न काङ्क्षति ।
समः सर्वेषु भूतेषु मद्भक्तिं लभते पराम्‌ ॥ १८-५४ ॥

भक्त्या मामभिजानाति यावान्यश्चास्मि तत्त्वतः ।
ततो मां तत्त्वतो ज्ञात्वा विशते तदनन्तरम्‌ ॥ १८-५५ ॥

सर्वकर्माण्यपि सदा कुर्वाणो मद्व्यपाश्रयः ।
मत्प्रसादादवाप्नोति शाश्वतं पदमव्ययम्‌ ॥ १८-५६ ॥

चेतसा सर्वकर्माणि मयि संन्यस्य मत्परः ।
बुद्धियोगमुपाश्रित्य मच्चित्तः सततं भव ॥ १८-५७ ॥

मच्चित्तः सर्वदुर्गाणि मत्प्रसादात्तरिष्यसि ।
अथ चेत्त्वमहङ्कारान्न श्रोष्यसि विनङ्क्ष्यसि ॥ १८-५८ ॥

यदहङ्कारमाश्रित्य न योत्स्य इति मन्यसे ।
मिथ्यैष व्यवसायस्ते प्रकृतिस्त्वां नियोक्ष्यति ॥ १८-५९ ॥

स्वभावजेन कौन्तेय निबद्धः स्वेन कर्मणा ।
कर्तुं नेच्छसि यन्मोहात्करिष्यस्यवशोऽपि तत्‌ ॥ १८-६० ॥

ईश्वरः सर्वभूतानां हृद्देशेऽर्जुन तिष्ठति ।
भ्रामयन्सर्वभूतानि यन्त्रारूढानि मायया ॥ १८-६१ ॥

तमेव शरणं गच्छ सर्वभावेन भारत ।
तत्प्रसादात्परां शान्तिं स्थानं प्राप्स्यसि शाश्वतम्‌ ॥ १८-६२ ॥

इति ते ज्ञानमाख्यातं गुह्याद्‍गुह्यतरं मया ।
विमृश्यैतदशेषेण यथेच्छसि तथा कुरु ॥ १८-६३ ॥

सर्वगुह्यतमं भूयः शृणु मे परमं वचः ।
इष्टोऽसि मे दृढमिति ततो वक्ष्यामि ते हितम्‌ ॥ १८-६४ ॥

मन्मना भव मद्भक्तो मद्याजी मां नमस्कुरु ।
मामेवैष्यसि सत्यं ते प्रतिजाने प्रियोऽसि मे ॥ १८-६५ ॥

सर्वधर्मान्परित्यज्य मामेकं शरणं व्रज ।
अहं त्वा सर्वपापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः ॥ १८-६६ ॥

इदं ते नातपस्काय नाभक्ताय कदाचन ।
न चाशुश्रूषवे वाच्यं न च मां योऽभ्यसूयति ॥ १८-६७ ॥

य इमं परमं गुह्यं मद्भक्तेष्वभिधास्यति ।
भक्तिं मयि परां कृत्वा मामेवैष्यत्यसंशयः ॥ १८-६८ ॥

न च तस्मान्मनुष्येषु कश्चिन्मे प्रियकृत्तमः ।
भविता न च मे तस्मादन्यः प्रियतरो भुवि ॥ १८-६९ ॥

अध्येष्यते च य इमं धर्म्यं संवादमावयोः ।
ज्ञानयज्ञेन तेनाहमिष्टः स्यामिति मे मतिः ॥ १८-७० ॥

श्रद्धावाननसूयश्च शृणुयादपि यो नरः ।
सोऽपि मुक्तः शुभाँल्लोकान्प्राप्नुयात्पुण्यकर्मणाम्‌ ॥ १८-७१ ॥

कच्चिदेतच्छ्रुतं पार्थ त्वयैकाग्रेण चेतसा ।
कच्चिदज्ञानसम्मोहः प्रनष्टस्ते धनञ्जय ॥ १८-७२ ॥

अर्जुन उवाच
नष्टो मोहः स्मृतिर्लब्धा त्वत्प्रसादान्मयाच्युत ।
स्थितोऽस्मि गतसन्देहः करिष्ये वचनं तव ॥ १८-७३ ॥

सञ्जय उवाच
इत्यहं वासुदेवस्य पार्थस्य च महात्मनः ।
संवादमिममश्रौषमद्भुतं रोमहर्षणम्‌ ॥ १८-७४ ॥

व्यासप्रसादाच्छ्रुतवानेतद्‍गुह्यमहं परम्‌ ।
योगं योगेश्वरात्कृष्णात्साक्षात्कथयतः स्वयम्‌ ॥ १८-७५ ॥

राजन्संस्मृत्य संस्मृत्य संवादमिममद्भुतम्‌ ।
केशवार्जुनयोः पुण्यं हृष्यामि च मुहुर्मुहुः ॥ १८-७६ ॥

तच्च संस्मृत्य संस्मृत्य रूपमत्यद्भुतं हरेः ।
विस्मयो मे महान्‌ राजन्हृष्यामि च पुनः पुनः ॥ १८-७७ ॥

यत्र योगेश्वरः कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरः ।
तत्र श्रीर्विजयो भूतिर्ध्रुवा नीतिर्मतिर्मम ॥ १८-७८ ॥

मूळ अठराव्या अध्यायाची समाप्ती
ॐ तत्सदिति श्रीमद्‌भगवद्‌गीतासूपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे मोक्षसंन्यासयोगो नामाष्टादशोऽध्यायः ॥ १८ ॥



गीता वाचताना प्ले करा



|| अध्याय अठरावा ||

अर्जुन म्हणाला,


        हे महाबाहो ! हे अंतर्यामी ! हे वासुदेवा ! मी “संन्यास” आणि “त्याग” यांचे तत्व वेग- वेगळे जाणू इच्छितो।।1।।


श्रीभगवान म्हणाले,


        कित्येक पण्डितगण काम्य कर्मांचे स्वरूपत: (सम्पूर्ण) त्यागालाच “संन्यास” जाणतात आणि सर्व कर्म फलांचे त्यागाला “त्याग” म्हणतात ।।2।।


        कोणी कोणी मनीषी (विद्वान) असे म्हणतात की सर्व कर्मे दोषयुक्त असतात आणि ते त्यागने योग्य आहेत, दुसरे विद्वान असे म्हणतात की यज्ञ, दान आणि तपस्यारूपी कर्मे त्यागने योग्य नाहीत।131।


        हे भरत श्रेष्ठ ! निश्चय श्रवण कर माझ्याकडून “त्याग” विषयी, हे पुरूषेश्वरा ! त्याग तीन प्रकाराचे म्हटले गेले आहेत । 41 ।


        यज्ञ, दान आणि तपस्यारूपी कर्मे पूर्णपणे त्यागने योग्य नाहीत, ते कर्तव्य कर्म अवश्य केले पाहिजेत. यज्ञ,दान आणि तप हे बुद्धिमान माणसांचे चित्ताला शुध्द (शांत) करणारे आहेत ।151।


        म्हणुन हे पार्थ ! ते यज्ञ ,दान ,तप आदि सर्व कर्मांचे आसक्तिरहित आणि फलांचा त्याग करून ते अवश्य केलीं पाहिजेत, हे माझे निश्चित असे उत्तम मत आहे।।61।


तीन प्रकारचे त्याग


        पंरतु नित्य कर्माचा स्वरूपत:(संपूर्ण) त्यागने योग्य नाही, म्हणुन मोहाने (अज्ञानाने) त्याग करणे याला “तामस त्याग” म्हटले आहे।।7।।


        जे काही कर्म आहेत “ते दु:खरूपच आहे” असे समजून जर कोणी शारीरिक त्रासाच्या भीतीने कर्तव्य कर्म सोडून देतो, तर त्याला असा “राजस त्याग” करून त्यागांचे फल कोणत्याहि प्रकारे मिळत नाही।।181।


        हे अर्जुना ! कर्तव्य समझून जो कर्म , नित्य आणि कर्तेपणाचा अभिमान नसूण फलांच त्याग कला जातो ,”सात्विक त्याग” मानला गेला आहे ।191।


        सत्वगुणांनी संपन्न, स्थिर बुध्दि असणारा आणि संशयरहित त्यागीगण दुख: रूपी कर्मा पासून द्वेष करत नाही आणी सुखरूपी कर्मात सुधा आसक्त होत नाही।।101।


        देहधारी जीवाला संपूर्ण कर्मांचा त्याग करणे शक्‍य नाही , परन्तु जे लोकं सर्व कर्म- फलांचे त्याग करणारे आहेत - तेच खरे त्यागी आहेत ,असे म्हणतात ।1111।


        देवत्तव ,मनुष्य तत्व आणि नारकीतत्व - तीन प्रकाराचे कर्मफल आहेत, जे त्यागीगण मृत्यु नंतर प्राप्त करतात. परन्तु संन्यासीगण यांच्या विषयात असे कधीच होत नाही (कारण ते परम गति मिळवतात)|1121।


        हे महाबाहो ! पाच कारण माझ्यापासून श्रवण कर, जे वेदांत शास्त्रात कर्म समाप्त करण्यास (उपाय )सांगितले आहेत, जे केल्यानी सर्व कर्मे सिद्ध होतात ।1131।


        देह, कर्ता, इन्द्रियाँ, विविध हावभाव (श्वास, डोळे बंद उधड) आणि पाचवे सर्व प्रेरक अंतर्यामी - असे पाच कारण वेदांमध्ये सांगितले आहेत। 1141 |


        माणसाचे काय, वाक्य आणि मनाचे द्वारा जे धर्म-अधर्मनी युक्‍त असलेले जे कर्म करतो , ते (वर सांगितलेले) पाच त्यांचे कारण आहेत।1151।


        असे जाणून सुधा जो व्यक्ति केवल आम्म्याला “सर्व कर्मांचे कर्ता आहे”, असे विचार करतो. असंस्कृत बुद्धि असल्याने तो व्यक्ति काहीही समझत नाही।1161।


        ज्याला कर्तेपणाचा अभिमान नाही, ज्यांचे कर्मफलात आसक्ति नसते . ते समस्त प्राण्यांची हत्या केले जरी वस्तुत त्यांचे हत्या करीत नाही (कर्मफलांनी लिप्त होत नाही)

111711


        ज्ञान , ज्ञेय आणि परिज्ञता - ये तीन कर्म प्रवृत्तिचि कारण आहेत , तसेच कारण , कर्म आणि कर्ता -ये तीन कर्मांचे आश्रय आहेत।1181।


        गुणांची संख्या करणारे शास्त्र “ज्ञान” “कर्म” आणि “कर्ता” हे गुणांच्या भेदाने तीन प्रकाराचे सांगितले गेले आहेत . ते तू माझ्याकडून ऐकून घे।।191।


तीन प्रकारचे ज्ञान


        ज्या ज्ञानामुळे माणुस “निरनिराळया सर्व भूतांमध्ये अविनाशी परमात्मभाव विभाग - रहित, अखण्ड, अव्यय, समभावाने भरून राहिला आहे” असे पाहतो , तो ज्ञान

सात्विक आहे, असे जाण।।20।।


        परंतु ज्या ज्ञानाने मनुष्य सर्व भूतांमध्ये भिन्न भिन्न नाना प्रकाराचे, भाव असणारे जीव- संबधी जो ज्ञान आहे, ते ज्ञानाला तू राजस समज।1211।


        परंतु जो ज्ञान एका कार्यरूपी (आंघोळ,जेवण, झोपणे आदि) शरीरातच पूर्णपणे व देहीक कार्यांमध्ये पुर्णपणे आसक्त करतो .तो (ज्ञान) युक्तिशून्य असून, तात्विक  अर्थरहित आणि पशु प्रकारे तुच्छ असते , तो (ज्ञान) तामस म्हटले गेले आहे।।22।।

तीन प्रकारचे कर्म


        जो कर्म शास्त्रविधिपूर्वक असून अहंकाररहित ,आसक्तिशून्य फळांची इच्छारहित आणि राग-द्वेषादि रहित असतो , तो(कर्म) सात्विक म्हटला जातो| ।23।।


        परंतु जे कर्म फळांची कामना करून ,अहंकारी व्यक्ति द्वारा अत्यंत क्लेश(अन्याय) पूर्वक केला जातो, तो कर्म राजसिक म्हटला जातो| ।241।


        जो भावी क्लेश(परनिंदा), धर्म व ज्ञानाचे नाशासाठी, आत्मनाश व हिंसा , आपल्या सामर्थयांची सृत्ती करत आणि (अज्ञान) मोहवश केला जातो, तो(कर्म) तामसिक म्हटला जातो ।1251।


 

तीन प्रकारचे कर्ता


        जो फलांची कामनारहित, अहंकारशून्य, धैर्य ,उत्साह सम्पन्न ,कार्यांची सिध्दि-असिध्दि मध्ये निर्विकार (समभाव) यांनी युक्‍त कर्म करीतो , सात्विक कर्ता म्हटला जातो ।।26।।


        जो आसक्तिरहित, कर्माच्या फळांची इच्छा करणारे ,लोभी, हिंसाप्रिय, अशुद्ध आचरणाच्या , हर्ष नंतर शोकमग्न असणारा , तो कर्ता राजस म्हटला जातो। 12711


        अनुचित कार्यप्रिय , स्वभावनुसार हावभावनी युक्‍त, अनम्न , शठ, दुसरांच्या अपमान करणारा ,आळशी, शोक करणारा आणि दीर्घसूत्री असणारा ,(असे माणसाला) तामस कर्ता म्हटला जातो।1281।


        हे धनंज्या ! गुणानुसार “बुध्दि” आणि “घृतिचे” ही तीन भेद आहेत ,मी थोडक्यात संपूर्ण आता सांगणार आहे, ते तू श्रवण कर।।1291।


तीन प्रकारची बुद्धि


        हे पार्थ ! जो प्रवृत्ति-निवृत्ति, कार्य-अकार्य ,झय-अभय आणि बंधन-मोक्ष जाणतो, त्यांची बुध्दि सात्विक आहे।1301।


        हे पार्थ ! जो धर्म-अधर्म आणि कार्य - अकार्य काय आहे? यर्थाथत रूपानी जाणत नाही, त्यांची बुध्दि राजसी आहे।1311।


        हे पार्थ ! जी बुद्धि अधर्माला धर्म मानते आणि सर्व धर्म विषयांचे उलटे अर्थ (निंदा) करून देत्ये. असे तामसा मुळे त्यांची बुध्दि भ्रष्ट झाल्यामुळे ,ती बुध्दि तामसी आहे।1321।


तीन प्रकारची घृति


        हे पार्थ ! योगअभ्यासपूर्वक ज्या अव्यभिचारिणी (यम-नियम-प्राणायाम) घृति द्वारा मन, प्राण आणि इन्द्रियांचे क्रियांना नियमित करतात, ती घृति सात्विक आहे ।1331।


        हे पार्थ ! हे अर्जुना ! जो पुरूष धर्म, काम आणि अर्थाला धारण करून .आसक्त मनाने व फल-आकाक्षा ठेवून घृति करतो, ती राजसी(घृति) आहे।1341।


        अविवेकी ,मदांनी युक्‍त होऊण ज्या घृति द्वारा निद्रा, भय, शोक , विषाद आणि विषय -भोगांपासून उत्पन्न होणारे सुखांचा त्याग करीत नाहीत, तामसी घृति आहे।1351।


        हे भरतश्रेष्ठा ! अता सुख विषयी तीन प्रकारे माझ्याद्वारे श्रवण कर, ज्यांचे पुन: पुन: अभ्यासा द्वारा संसाररूप दुखांचा अंत होतो, (तो सुख) सात्विक आहे।1361।


तीन प्रकराचे सुख


        जो काही सुख आरंभी विष (त्रासा) सारखे पण परिणामात अमृतासारखे आहे, आणि जो आत्म विषयक बुद्धि प्रसादाने (भक्तियोगाने) उत्पन्न होतो, त्या सुखाला सात्विक म्हटला जातो ।1371।


        विषय -इन्द्रिय संयोगाने जे सुख उत्पन्न होतात, ते शुरूवातीला अमृता सारखे परिणामात विष (दुख) देणारे आहेत , ते सुख राजसी आहे।।1381।


        जो सुख आगोदर आणि नंतर आत्म स्वरूपाला आवृत्त (मोह) देणारे आहे. जो (सुख) झोप, आळस आणि प्रमाद (हिंसा) द्वारा उत्पन्न होतो, तो तामसिक सुख आहे।।391।


        पृथ्वीवर अर्थात मनुष्य आदि, व स्वर्गात आणि काय देवगणात असलेले प्राणी व असे पदार्थही नाही जे प्रकृतिपासून उत्पन्न झालेल्या या तीन गुणांनी मुक्‍त आहे ।।1401।


चार प्रकारचे मनुष्य वर्ग

        हे परंतपा ! ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य (व्यापारी, श्रेतकरी) आणि शूद्रांचे कर्म स्वभावत: उत्पन्न गुणांचे अनूरूप निरनिराळे (मनुष्य) वर्गात केले आहेत | 41 ||


        शम , दम , तप, शौच , सहिष्णुता , सरलता, ज्ञान , विज्ञान आणि आस्किता( हढ निश्चय) -ये सर्व ब्राह्मणांचे स्वभावाने उत्पन्न कर्म आहेत।।421।


        शौर्य , तेज, धृति ,दक्षता ,युध्दातून पलायन न करणे, दान देने आणि लोकांचे नेतृत्व करणें , ये सर्व क्षत्रियांचे स्वभाविक कर्म आहेत ।।431।


        कृषि, गोरक्षा वाणिज्य आदि वैश्यांचे स्वाभाविक कर्म आहेत आणि दुसर्याचे सेवा करणें शुद्रांचे स्वभाविक कर्म आहेत।।441।


स्वकर्म- ईश्वर सेवा


        आप-आपल्या अधिकार अनुसार कर्मांमध्ये निपुण माणूस योग्यता रूपी सिद्धि प्राप्त करून घेतो ,ते सर्व निपुण असलेले व्यक्ति कसे सिद्धि प्राप्त करतात, ते तू श्रवण कर|1451।


        ज्यांचे द्वारा या जीवांची उत्पत्ती होते आणि ज्यांनी ये सम्पूर्ण जग व्याप्ले आहेत . माणस आपल्या कर्मा द्वारा परमेश्वराची उपासना करून सिध्दि मिळवतात ।।46।।


        दुसरांच्या धर्मापेक्षा उत्तम रूपाने अनुष्ठित केलेले स्वधर्मच लोकांच कल्याण करणारे आहेत , कारण मानव स्वभाविक कर्मे करून पापांनी लिप्त होत नाही।।471।


        हे कौन्तेय ! कर्म दोषयुक्त असले तरी स्वाभाविक(दान,तप,उपासनादि) कर्मांचा त्याग नाही केला पाहिजे, कारण सर्व कर्मे दोषांनी आवृत्त आहे ,जसे अग्नि धूराने आवृत्त आहे 114811


 नैष्कमर्यसिद्धि


        सर्वत्र आसक्तिरहित बुद्धि असलेली निस्पृह (कामनाशून्य) आणि अंत:करण जिंकले- ल्या मनुष्य स्वरूपत कर्म त्याग करून नैष्कमर्य रूपी श्रेष्ठ सिध्दि प्राप्त करतो।।491।


        हे कौन्तेय ! सिध्दि प्राप्त केलेल्या व्यक्ति ज्या साधनाने ब्रह्माची प्राप्ती करतो, जो की ज्ञानाची परमगति (शेवट) आहे, ते सर्व साधना माझ्याकडून थोडक्यात श्रवण

कर।1501।


        विशुद्ध बुद्धियुक्‍्त होऊन, घृति द्वारा मन संयत करून, शब्दादि विषयांच्या त्याग करून, राग-द्वेषांना लांब करून |151।।


        पवित्र निर्जन स्थानी राहून ,अल्पआहारपूर्वक ,कायमनवाक्य(इन्द्रिय) संयतकरून सर्वदा परमात्म (ऊँ) ध्यानयोग आणि वैराग्याचा आश्रयकर।।521।


        अहंकार, बल ,दर्प, काम ,क्रोध आणि परिग्रहाच्या(दान-ग्रहणाचा) त्याग करून ,(देह) ममता शुन्य और उपशम(शांतता) प्राप्त केलेले पुरूष बह्य अनुभवाचे योग्य होतात 115311


        ब्रह्ममध्ये अवस्थित, प्रसन्नचित व्यक्ति न शोक(दुख) करतो न आकांक्षा ठेवतो. तो सर्व प्राणीमात्रां बदल समभाव ठेवणारा योगी माझ्या परम भक्तिला प्राप्त करतो।।541।


समर्पणाचा योग


        जे माझे विभूत्तिसंपन्न, जसे माझे स्वरूप आहे . त्याला तत्वत ,अनन्य भक्‍्तिनेच जाणू शकतो. तो भक्त माझ्या प्रेमा भक्तिचे बळाने मला तत्वत जाणून ,माझ्या नित्य लीला मध्ये प्रवेश करतो|1551।


        माझे एकान्त भक्तगण सर्व कर्म करीत असले तरी. माझ्या कृपेणे ते नित्य, अव्यय , वैकृण्ठ धामाला प्राप्त करतात।1561।


        हे अर्जुना ! तू अहंकारशून्य चित्त द्वारा सर्व कर्म मला समर्पित करून आणि बुद्धि(ज्ञान) योगाचा अवलंबन करून माझे परायण हो आणि निरंतर माझ्या ठिकाणी चित्त असलेला हो|1571।


        माझ्या ठिकाणी चित्त ठेवल्याने तू माझ्या कृपेने सर्व संकटातुन सहजच पार होशील आणि जर अंहकारामुळे माझे सांगणे न ऐकशील तर संसारात नाश पावशील।।58।।


        अहंकाराच्या आश्रय घेऊन तू असे मानतोस की “मी युध्द करणार नाही” ,तो निश्चय व्यर्थ आहे . कारण तुझा स्वभाव तुला जबरदस्तीने युद्ध करावयास लावील।1591।


        है कौन्तेय ! जे कर्म तू मोहवश करू इच्छित नाहीस, तेही आपल्या पूर्वोक्त स्वभाविक कर्माने बध्द असल्यामुळे पराधीन होऊण अवश्य करशील।।160।।


        हे अर्जुना ! ईश्वर सर्व जीवांमध्ये अवस्थान करताता आणि आपल्या मायेने यंत्रआरूढ सारखे सर्व जीवांना त्यांचा कर्मानुसार संसार चक्ररात फिरवीतात।।61।।


        हे भारता ! सर्व प्रकारे तू ईधराचेच शरणात जा(आश्रय घे) ,त्यांच्या कृपेने तू नित्य परम शांति आणि परम नित्य धाम प्राप्त करशील।।621।


        या प्रकारे गुप्त ज्ञान माझा द्वारा सांगितला गेला आहे ,आता तू या रहस्यमय ज्ञानाचा संपूर्णपणे चांगले प्रकारे विचार करून मग जसे तुला आवडेल तसेच कर|।631।


        सर्वांपासून अत्यंत रहस्यपूर्ण माझे हे वाकय पुन: श्रवन कर, तू माझे परम मित्र आहेस, अतएव तूझ्या हितासाठी सांगेन ।।64।।


        तूमला आपले चित्त समर्पित कर, माझ्या नाम-रूप-गुणादि कीर्तनात आदि मत्परायण होऊन माझा भक्त हो, माझे पूजनज करणारा हो ,मला नमस्कार कर अशा प्रकारे तू मलाच प्राप्त करशील , मी तूला सत्य प्रतिज्ञा करतो, कारण तू मला अतिशय प्रिय आहेस ।1651।


        (वर्ण-आश्रमादि शारीरिक आणि मानसिक) सर्व धर्मांचा परित्याग करून एकमात्र माझे शरण ग्रहण कर, म्हणजे मी तूला सर्व पापांपासून मुक्‍त करीन ,तू शोक करू नकोस 11661।


        या गीताशास्त्राला तू कधी ही असंयमित ,अभक्त ,सेवाविहिन आणि माझे द्वेष करणारे लोकांना सांगू नेय।।67।।


        जो मनुष्य या गीता शास्त्राचा उपदेश माझ्या भक्तांना देतीले ते माझ्या प्रति पराभक्ति प्राप्त करून संशयशून्य होऊन मलाच प्राप्त होतील।।681।


        मनूष्यांमध्ये “गीता” ची व्याख्या करणारा पेक्षा अधिक कोणीहिं माझे प्रिय कार्य करणारा नाही आणि या समस्त जगात त्यांच्या पेक्षा अधिक कोणीहिं मला प्रिय नाही व होणार ।1691।


        आणि जो व्यक्ति आपल्या दोघांच्या या धर्म संवादांचे अध्ययन करील ,त्याचे द्वारा मी “ज्ञानयज्ञानी” पुजीत होईन, असे माझे मत आहे।।701।


        जे श्रद्धावान आणि द्वेषरहित व्यक्ति याचा (गीतेचा) श्रवण जरी करत असतील, ते पापमुक्त होऊन पुण्य कर्मे करणारे श्रेष्ठ (उच्चतम) लोकांना प्राप्त होतील।।71।।


        हे पार्थ ! हे गीताशास्त्र तू एकाग्र चित्ताने ऐकलेस का ? आणि हे धनंजया ! तुझे अज्ञानातून उत्पन्न झालेला हा मोह नाहीसा झाला का? ।1721।


अर्जुन म्हणाला !

        हे अच्युता ! आपल्या कृपेणे माझे हे मोह नष्ट झाले आहे आणि मी आल्मस्मृत्ति प्राप्त केली आहे ,माझे सर्व संशय निघूण गेळे आहेत आणि मी यथाज्ञानात अवस्थित झालो आहे. म्हणुन मी आपल्या आज्ञेचे पालन करीन।।731।


संज्जय म्हणाला !


        या प्रकारे मी महात्मा वासुदेव आणि पार्थ अर्जुनांच्या मध्ये झालेले या अद्भुत रोमांचकारी संवादाला ऐकले।1741।


        श्रीवेदव्यासांच्या कृपेणे मी हे साक्षात वर्णकारी स्वयं योगेश्वर श्रीकृष्णापासून या परम रहस्यमय योगाला ऐकले ।।751।


        हे राजन ! श्रीकेशव आणि अर्जुनाचे या पुण्य अद्भुत संवादाला वारंवार स्मरण करून मी वारंवार हर्षित होत आहे।।1761।


        हे राजन! श्रीहरीचे या अत्यंत अद्‌भुत रूपांचा वारंवार स्मरण करून मी परम विस्मित (आनंदीत) होत आहे।1771।


        जिकडे श्रीयोगेश्वर आणि अर्जुन आहेत , तिकडेच श्री (राज्यलक्ष्मी) आहे ,विजय, ऐश्वरयवृध्दि, आणि नारायण परायणता विघमान आहे - हेच माझे निश्चित असे (उत्तम) मत आहे।।781।


ॐ हे परमसत्य आहे. याप्रमाणे श्रीमद्‌भगवद्‌गीतारूपी उपनिषद तथा ब्रह्मविद्या आणि योगशास्त्राविषयी श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्या संवादातील मोक्षसंन्यासयोग नावाचा हा अठरावा अध्याय समाप्त झाला. ॥ १८ ॥


मूळ अठराव्या अध्यायाची समाप्ती

   “हे अर्जुना ! तू जीवात्मा आहेस या आल्म्याला शस्त्र कापू शकत नाही, अग्नी जाळू

शक्त नाही, पाणी भिजवू शकत नाही, आणि वारा वाळवू शकत नाही ।।2:23।1”


“जे अनन्य कामनारहित भक्‍त मज परमेश्वराला निरंतर चिंतन करीत सर्वोत भावनाने

भजतात, त्या नित्य माझे चिंतन करणारे व्यक्तिंचे योग(धन-धाण्य) आणि क्षेम मी

स्वत: त्यांना प्राप्त करून (वहाम्यहम्‌ -वाहून) देतो।।9:221।”


 “ श्रीकृष्ण:जो व्यक्ति आपल्या दोघांच्या या धर्म संवादाचा अध्ययन करील ,त्याचे द्वारा

मी “ज्ञानयज्ञानी” पुजीत होईन, असे माझे मत आहे।।18:701।”

 

Maulimajhi-blogger


धन्यवाद !


Copyright by :DeviAnaghaVedic Vigyan

Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for "fair use" for purposes such as criticism, commenting, news reporting, teaching, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balance in favour of fair use.