श्रीमद्भागवत गीता | अध्याय 2 ( सांख्य योग ) | Srimadbhagavata Gita | adhyay 2 ( Sankhya Yog)

shreyash feed ads 2
श्रीमद्भागवत गीता | अध्याय 2 ( सांख्य योग ) | Srimadbhagavata Gita | adhyay 2 ( Sankhya Yog)

माझी माऊली अँप डाउनलोड करा 👉  Download

माझी माऊली whatsapp ग्रुप मध्ये सामील व्हा👉🏻 Join 







/>



अथ द्वितीयोऽध्यायः (द्वितीय अध्याय )
सञ्जय उवाच: तं तथा कृपयाविष्टमश्रुपूर्णाकुलेक्षणम्‌ ।
विषीदन्तमिदं वाक्यमुवाच मधुसूदनः ॥ २-१ ॥

श्रीभगवानुवाच: कुतस्त्वा कश्मलमिदं विषमे समुपस्थितम्‌ ।
अनार्यजुष्टमस्वर्ग्यमकीर्तिकरमर्जुन ॥ २-२ ॥

क्लैब्यं मा स्म गमः पार्थ नैतत्त्वय्युपपद्यते ।
क्षुद्रं हृदयदौर्बल्यं त्यक्त्वोत्तिष्ठ परन्तप ॥ २-३ ॥

अर्जुन उवाच: कथं भीष्ममहं सङ्ख्ये द्रोणं च मधुसूदन ।
इषुभिः प्रतियोत्स्यामि पूजार्हावरिसूदन ॥ २-४ ॥

गुरूनहत्वा हि महानुभावाञ्छ्रेयो भोक्तुं भैक्ष्यमपीह लोके ।
हत्वार्थकामांस्तु गुरूनिहैव भुञ्जीय भोगान्‌ रुधिरप्रदिग्धान्‌ ॥ २-५ ॥

न चैतद्विद्मः कतरन्नो गरीयो यद्वा जयेम यदि वा नो जयेयुः ।
यानेव हत्वा न जिजीविषामस्तेऽवस्थिताः प्रमुखे धार्तराष्ट्राः ॥ २-६ ॥

कार्पण्यदोषोपहतस्वभावः पृच्छामि त्वां धर्मसंमूढचेताः ।
यच्छ्रेयः स्यान्निश्चितं ब्रूहि तन्मे शिष्यस्तेऽहं शाधि मां त्वां प्रपन्नम्‌ ॥ २-७ ॥

न हि प्रपश्यामि ममापनुद्याद्यच्छोकमुच्छोषणमिन्द्रियाणाम्‌ ।
अवाप्य भूमावसपत्‍नमृद्धं राज्यं सुराणामपि चाधिपत्यम्‌ ॥ २-८ ॥

सञ्जय उवाच: एवमुक्त्वा हृषीकेशं गुडाकेशः परन्तप ।
न योत्स्य इति गोविन्दमुक्त्वा तूष्णीं बभूव ह ॥ २-९ ॥

तमुवाच हृषीकेशः प्रहसन्निव भारत ।
सेनयोरुभयोर्मध्ये विषीदन्तमिदं वचः ॥ २-१० ॥

श्रीभगवानुवाच: अशोच्यानन्वशोचस्त्वं प्रज्ञावादांश्च भाषसे ।
गतासूनगतासूंश्च नानुशोचन्ति पण्डिताः ॥ २-११ ॥

न त्वेवाहं जातु नासं न त्वं नेमे जनाधिपाः ।
न चैव न भविष्यामः सर्वे वयमतः परम्‌ ॥ २-१२ ॥

देहिनोऽस्मिन्‌ यथा देहे कौमारं यौवनं जरा ।
तथा देहान्तरप्राप्तिर्धीरस्तत्र न मुह्यति ॥ २-१३ ॥

मात्रास्पर्शास्तु कौन्तेय शीतोष्णसुखदुःखदाः ।
आगमापायिनोऽनित्यास्तांस्तितिक्षस्व भारत ॥ २-१४ ॥

यं हि न व्यथयन्त्येते पुरुषं पुरुषर्षभ ।
समदुःखसुखं धीरं सोऽमृतत्वाय कल्पते ॥ २-१५ ॥

नासतो विद्यते भावो नाभावो विद्यते सतः ।
योरपि दृष्टोऽन्तस्त्वनयोस्तत्त्वदर्शिभिः ॥ २-१६ ॥

अविनाशि तु तद्विद्धि येन सर्वमिदं ततम्‌ ।
विनाशमव्ययस्यास्य न कश्चित्कर्तुमर्हति ॥ २-१७ ॥

अन्तवन्त इमे देहा नित्यस्योक्ताः शरीरिणः ।
अनाशिनोऽप्रमेयस्य तस्माद्युध्यस्य भारत ॥ २-१८ ॥

य एनं वेत्ति हन्तारं यश्चैनं मन्यते हतम्‌ ।
उभौ तौ न विजानीतो नायं हन्ति न हन्यते ॥ २-१९ ॥

न जायते म्रियते वा कदाचिन्नायं भूत्वा भविता वा न भूयः ।
अजो नित्यः शाश्वतोऽयं पुराणो न हन्यते हन्यमाने शरीरे ॥ २-२० ॥

वेदाविनाशिनं नित्यं य एनमजमव्ययम्‌ ।
कथं स पुरुषः पार्थ कं घातयति हन्ति कम्‌ ॥ २-२१ ॥

वासांसि जीर्णानि यथा विहाय नवानि गृह्णाति नरोऽपराणि ।
तथा शरीराणि विहाय जीर्णान्यन्यानि संयाति नवानि देही ॥ २-२२ ॥

नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः ।
न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः ॥ २-२३ ॥

अच्छेद्योऽयमदाह्योऽयमक्लेद्योऽशोष्य एव च ।
नित्यः सर्वगतः स्थाणुरचलोऽयं सनातनः ॥ २-२४ ॥

अव्यक्तोऽयमचिन्त्योऽयमविकार्योऽयमुच्यते ।
तस्मादेवं विदित्वैनं नानुशोचितुमर्हसि ॥ २-२५ ॥

अथ चैनं नित्यजातं नित्यं वा मन्यसे मृतम्‌ ।
तथापि त्वं महाबाहो नैवं शोचितुमर्हसि ॥ २-२६ ॥

जातस्य हि ध्रुवो मृत्युर्ध्रुवं जन्म मृतस्य च ।
तस्मादपरिहार्येऽर्थे न त्वं शोचितुमर्हसि ॥ २-२७ ॥

अव्यक्तादीनि भूतानि व्यक्तमध्यानि भारत ।
अव्यक्तनिधनान्येव तत्र का परिदेवना ॥ २-२८ ॥

आश्चर्यवत्पश्यति कश्चिदेनमाश्चर्यवद्वदति तथैव चान्यः ।
आश्चर्यवच्चैनमन्यः शृणोति श्रुत्वाप्येनं वेद न चैव कश्चित्‌ ॥ २-२९ ॥

देही नित्यमवध्योऽयं देहे सर्वस्य भारत ।
तस्मात्सर्वाणि भूतानि न त्वं शोचितुमर्हसि ॥ २-३० ॥

स्वधर्ममपि चावेक्ष्य न विकम्पितुमर्हसि ।
धर्म्याद्धि युद्धाच्छ्रेयोऽन्यत्क्षत्रियस्य न विद्यते ॥ २-३१ ॥

यदृच्छया चोपपन्नं स्वर्गद्वारमपावृतम्‌ ।
सुखिनः क्षत्रियाः पार्थ लभन्ते युद्धमीदृशम्‌ ॥ २-३२ ॥

अथ चेत्त्वमिमं धर्म्यं सङ्ग्रामं न करिष्यसि ।
ततः स्वधर्मं कीर्तिं च हित्वा पापमवाप्स्यसि ॥ २-३३ ॥

अकीर्तिं चापि भूतानि कथयिष्यन्ति तेऽव्ययाम्‌ ।
सम्भावितस्य चाकीर्तिर्मरणादतिरिच्यते ॥ २-३४ ॥

भयाद्रणादुपरतरं मंस्यन्ते त्वां महारथाः ।
येषां च त्वं बहुमतो भूत्वा यास्यसि लाघवम्‌ ॥ २-३५ ॥

अवाच्यवादांश्च बहून्वदिष्यन्ति तवाहिताः ।
निन्दन्तस्तव सामर्थ्यं ततो दुःखतरं नु किम्‌ ॥ २-३६ ॥

हतो वा प्राप्स्यसि स्वर्गं जित्वा वा भोक्ष्यसे महीम्‌ ।
तस्मादुत्तिष्ठ कौन्तेय युद्धाय कृतनिश्चयः ॥ २-३७ ॥

सुखदुःखे समे कृत्वा लाभालाभौ जयाजयौ ।
ततो युद्धाय युज्यस्य नैवं पापमवाप्स्यसि ॥ २-३८ ॥

एषा तेऽभिहिता साङ्ख्ये बुद्धिर्योगे त्विमां शृणु ।
बुद्ध्या युक्तो यया पार्थ कर्मबन्धं प्रहास्यसि ॥ २-३९ ॥

नेहाभिक्रमनाशोऽस्ति प्रत्यवायो न विद्यते ।
स्वल्पमप्यस्य धर्मस्य त्रायते महतो भयात्‌ ॥ २-४० ॥

व्यवसायात्मिका बुद्धिरेकेह कुरुनन्दन ।
बहुशाखा ह्यनन्ताश्च बुद्धयोऽव्यवसायिनाम्‌ ॥ २-४१ ॥

यामिमां पुष्पितां वाचं प्रवदन्त्यविपश्चितः ।
वेदवादरताः पार्थ नान्यदस्तीति वादिनः ॥ २-४२ ॥

कामात्मानः स्वर्गपरा जन्मकर्मफलप्रदाम्‌ ।
क्रियाविशेषबहुलां भोगैश्वर्यगतिं प्रति ॥ २-४३ ॥

भोगैश्वर्यप्रसक्तानां तयापहृतचेतसाम्‌ ।
व्यवसायात्मिका बुद्धिः समाधौ न विधीयते ॥ २-४४ ॥

त्रैगुण्यविषया वेदा निस्त्रैगुण्यो भवार्जुन ।
निर्द्वन्द्वो नित्यसत्त्वस्थो निर्योगक्षेम आत्मवान्‌ ॥ २-४५ ॥

यावानर्थे उदपाने सर्वतः सम्प्लुतोदके ।
तावान्सर्वेषु वेदेषु ब्राह्मणस्य विजानतः ॥ २-४६ ॥

कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन ।
मा कर्मफलहेतुर्भूर्मा ते सङ्गोऽस्त्वकर्मणि ॥ २-४७ ॥

योगस्थः कुरु कर्माणि सङ्गं त्यक्त्वा धनञ्जय ।
सिद्ध्यसिद्ध्योः समो भूत्वा समत्वं योग उच्यते ॥ २-४८ ॥

दूरेण ह्यवरं कर्म बुद्धियोगाद्धनञ्जय ।
बुद्धौ शरणमन्विच्छ कृपणाः फलहेतवः ॥ २-४९ ॥

बुद्धियुक्तो जहातीह उभे सुकृतदुष्कृते ।
तस्माद्योगाय युज्यस्व योगः कर्मसु कौशलम्‌ ॥ २-५० ॥

कर्मजं बुद्धियुक्ता हि फलं त्यक्त्वा मनीषिणः ।
जन्मबन्धविनिर्मुक्ताः पदं गच्छन्त्यनामयम्‌ ॥ २-५१ ॥

यदा ते मोहकलिलं बुद्धिर्व्यतितरिष्यति ।
तदा गन्तासि निर्वेदं श्रोतव्यस्य श्रुतस्य च ॥ २-५२ ॥

श्रुतिविप्रतिपन्ना ते यदा स्थास्यति निश्चला ।
समाधावचला बुद्धिस्तदा योगमवाप्स्यसि ॥ २-५३ ॥

अर्जुन उवाच: स्थितप्रज्ञस्य का भाषा समाधिस्थस्य केशव ।
स्थितधीः किं प्रभाषेत किमासीत व्रजेत किम्‌ ॥ २-५४ ॥

श्रीभगवानुवाच: प्रजहाति यदा कामान्सर्वान्पार्थ मनोगतान्‌ ।
आत्मन्येवात्मना तुष्टः स्थितप्रज्ञस्तदोच्यते ॥ २-५५ ॥

दुःखेष्वनुद्विग्नमनाः सुखेषु विगतस्पृहः ।
वीतरागभयक्रोधः स्थितधीर्मुनिरुच्यते ॥ २-५६ ॥

यः सर्वत्रानभिस्नेहस्तत्तत्प्राप्य शुभाशुभाम्‌ ।
नाभिनन्दति न द्वेष्टि तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता ॥ २-५७ ॥

यदा संहरते चायं कूर्मोऽङ्गानीव सर्वशः ।
इन्द्रियाणीन्द्रियार्थेभ्यस्तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता ॥ २-५८ ॥

विषया विनिवर्तन्ते निराहारस्य देहिनः ।
रसवर्जं रसोऽप्यस्य परं दृष्ट्वा निवर्तते ॥ २-५९ ॥

यततो ह्यपि कौन्तेय पुरुषस्य विपश्चितः ।
इन्द्रियाणि प्रमाथीनि हरन्ति प्रसभं मनः ॥ २-६० ॥

तानि सर्वाणि संयम्य युक्त आसीत मत्परः ।
वशे हि यस्येन्द्रियाणि तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता ॥ २-६१ ॥

ध्यायतो विषयान्पुंसः सङ्गस्तेषूपजायते ।
सङ्गात्सञ्जायते कामः कामात्क्रोधोऽभिजायते ॥ २-६२ ॥

क्रोधाद्भवति सम्मोहः सम्मोहात्स्मृतिविभ्रमः ।
स्मृतिभ्रंशाद्‌ बुद्धिनाशो बुद्धिनाशात्प्रणश्यति ॥ २-६३ ॥

रागद्वेषवियुक्तैस्तु विषयानिन्द्रियैश्‍चरन्‌ ।
आत्मवश्यैर्विधेयात्मा प्रसादमधिगच्छति ॥ २-६४ ॥

प्रसादे सर्वदुःखानां हानिरस्योपजायते ।
प्रसन्नचेतसो ह्याशु बुद्धिः पर्यवतिष्ठते ॥ २-६५ ॥

नास्ति बुद्धिर‍युक्तस्य न चायुक्तस्य भावना ।
न चाभावयतः शान्तिरशान्तस्य कुतः सुखम्‌ ॥ २-६६ ॥

इन्द्रियाणां हि चरतां यन्मनोऽनुविधीयते ।
तदस्य हरति प्रज्ञां वायुर्नावमिवाम्भसि ॥ २-६७ ॥

तस्माद्यस्य महाबाहो निगृहीतानि सर्वशः ।
इन्द्रियाणीन्द्रियार्थेभ्यस्तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता ॥ २-६८ ॥

या निशा सर्वभूतानां तस्यां जागर्ति संयमी ।
यस्यां जाग्रति भूतानि सा निशा पश्यतो मुनेः ॥ २-६९ ॥

आपूर्यमाणमचलप्रतिष्ठं समुद्रमापः प्रविशन्ति यद्वत्‌ ।
तद्वत्कामा यं प्रविशन्ति सर्वे स शान्तिमाप्नोति न कामकामी ॥ २-७० ॥

विहाय कामान्यः सर्वान्पुमांश्चरति निःस्पृहः ।
निर्ममो निरहङ्कारः स शान्तिमधिगच्छति ॥ २-७१ ॥

एषा ब्राह्मी स्थितिः पार्थ नैनां प्राप्य विमुह्यति ।
स्थित्वास्यामन्तकालेऽपि ब्रह्मनिर्वाणमृच्छति ॥ २-७२ ॥

मूळ दुसऱ्या अध्याय समाप्ती

ॐ तत्सदिति श्रीमद्‌भगवद्‌गीतासूपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे साङ्ख्ययोगो नाम द्वितीयोऽध्यायः ॥ २ ॥ अर्थ



गीता वाचताना प्ले करा



|| द्वितीय अध्याय ||

संजय म्हणाला,

        अशा रीतीने करूणेनें व्याप्त, ज्याचे डोळे अश्रुन्नि भरलेले व व्याकुळ दिसत आहेत,अशा शोक करणारा अर्जुनाला भगवान मधुसूदन असे वचन म्हणाले।11।।

श्रीभगवान म्हणाले ,

        "हे अर्जुना ! या भलत्याच वेळी हा मोह तुला कशा मुळे उत्पन्न झाला ? कारण हा थोरांनी (शत्रुज्ञी सुधा) न आचरिलेला ,स्वर्ग मिळवून न देणारा आणि कीर्ति कारकही नाही ।।21। 

        म्हणून हे पार्थ ! षंढपणा पत्करू नकोस ,हा तुला शोभत नाही, हे परंतपा ! अंत:करणाचें हें तुच्छ दुबळेपणा सोडून देऊन युध्दाला उभा रहा ।131।"


अर्जुन म्हणाला,

        "हे मधुसुदना ! युध्दात मी भीष्म पितामा (प्रिय आजोबा) आणि द्रोणाचार्य ( प्रिय गुरू)  विरुध्द बाणांनी कसा लढू?  कारण   हे मधुसुदना ! ते दोघेही माझ्यासाठी पुज्यनीय आहेत." ।141।

        "गुरूजनांना न मारता मी हे जगात भिक्षा मागुन खाणेही कल्याण कारक आहे , कारण गुरूजंनाना मारूनही या लोकात रक्ताने माखलेले अर्थ व कामरूप भोगच तर भोगावयाचे आहे." ।15।।

        "युद्धात जय आणि पराजय मिळवणे यामध्ये काय श्रेष्ठ आहे, मला समजत नाही. ज्यांना मारून आम्हांला जगण्याची ही इच्छा नाही, तेच आमचे बांधव-धृतराष्ट्रपुत्र युध्दासाठी समोर उभे आहेत." ।।61।

        "करूणानी व्याप्त ज्याचे मूळ (क्षत्रीय) स्वभाव नाहीसा झाला आहे व धर्म-अर्धर्माचा  निर्णय करण्याविषयी ज्याची बुद्धि असमर्थ आहे ,असे मी तुम्हाला विचारत आहे की,

        "जे साधन खात्रीने कल्याणकारक आहे ते मला सांगा, मी तुमचा शिष्य आहे तुमच्या शरणात आलो आहे, मला उपदेश करा, |17।।

          कारण ,पृथ्वी जवळ आणि धन-धान्यादि समृध्द राज्य मिळाले किंवा देवांचे स्वामितत्व जरी मिळाले तरी माझ्या इन्द्रियांना शोषुन टाकणारी हे शोकाला जो दुर करू शकेल, असा उपाय मला दिसतही नाही." ।।181।


संजय म्हणाला,

        "हे राजन धुतराष्ट्र ! निंद्रेवर ताबा असलेल्या आणि शत्रुंवर विजय मिळवणाऱ्या अर्जुनाने अंतर्यामी श्रीकृष्णाला एवढे बोलून “मी युध्द करणार नाही “ असे स्पष्टपणे सांगितले व तो गप्प झाला." |191।

        हे भरतवंशी धृतराष्ट्र महाराज ! अंतर्यामी भगवान श्रीकृष्ण दोन्ही सैन्यांच्या मध्यभागी खिन्न होऊन बसलेल्या त्या अर्जुनास हंसल्यासारखे करून असें म्हणाले, ।।101।

श्रीभगवान म्हणाले,

        "हे अर्जुना ! ज्या वस्तुंचे(लोकंच) विचार करणें योग्य नाही, असे वस्तुंसाठी तू शोक करतोस आणि विद्वाना सारखा युक्तिवादहीं करतोस, परन्तु ज्यांचे प्राण आहेत आणि ज्यांचे प्राण गेले आहेत ,त्यांचासाठी पण्डितगण (पंडित) सुधा शोक करत नाही." ।॥111।

        "मी (कृष्ण) कोणत्याहि काळी नव्हतो, तू(अर्जुन) नव्हतास किंवा हे राजे नव्हते असेहि नाही आणि या पुढे (भविष्यमध्ये) आम्ही सर्वजण असणार नाही ,असेहि नाही." ।1121।

        "जसे शरीरधारी जीवात्माच्या स्थूल शरीरात क्रमंकाने बालपण, तारूण्य आणि वृध्दपणा येतो, त्याचप्रमाणे आत्मयाला सुधा दुसरे नवीन देह (शरीर) मिळत असतात, या विषयी धीर पुरूषांच्या मनात मोह उत्पन्न होत नाही " ।।1131।

        "हे कुन्तीपुत्रा ! इंन्द्रियांचे स्वभावात विषयांशी संयोग हे ठंडी-उष्ण, सुख-दुख देणारे आहेत, ते उत्पन्न होतात व नाहीसे ही होतात, म्हणुन ते सर्व भास अनित्य आहेत. तेव्हा हे भारत! क्षुब्ध न होता मनुष्यानें ते सर्व सहन करण्यास शिकले पाहिजे." ।1141।।

        "कारण हे श्रेष्ठ पुरूषा ! जो विषयांनी व्यथित होत नाही, ज्याला सुख व दुख सारखीच क्षणभंगुर व उपेक्षणीय वाटतात, व जो धैर्य सोडीत नाही, तोच खात्रीने मोक्षाला (अमृतत्वाला) योग्य होतो." 11151।

1॥आत्मा व शरीर ।।

    "असत्‌(सुख -दुख आदि) वस्तुला अस्तित्व नाही आणि सत्‌(आत्मा) वस्तुंचा विनाशही नाही. अशा रीतीने या दोन्ही सत्य स्वरूपाला तत्वज्ञानी पुरूषांनी पाहिले आहेत, ।।161।

         पण, ज्यानें हे संपुर्ण शरीर व जग व्यापिलें आहेत, तो अविनाशी आहे. हे लक्षात ठेव, कोणीही या अविनाशी (आत्म) तत्वाचा नाश करण्यास (मी सुधा) सक्षम नाही." ।1171।


        "हे अर्जुना ! (तू जीवात्मा आहेस) ,हा(आत्मा) नाशरहित, मोजता न येणारा (अणु पेक्षा सुक्ष्म, नित्यस्वरूप आणि शाश्वत आहे, जीवात्म्याला प्राप्त होणारे सर्व भौतिक शरीरे नाशवंत आहेत ,असे म्हटले गेले आहेत , म्हणून हे भरतवंशी अर्जुना ! तू युध्द कर. "|।1181।

        "जो या आत्म्याला मारणारा व मारणारा असे मानतो, ते दोघेंही अज्ञ आहेत. कारण आत्मा वास्तविक पाहता कोणाला मारतहिं नाही आणि कोणाकडून मारलाहिं जात नाही."।1191|

        "हा आत्मा कधीहिं जन्मत नाही आणि मरतहिं नाही, तसेच हा एकदा उत्पन्न झाल्यावर पुन: उत्पन्न होणारा नाही. कारण हा जन्म नसलेला, नित्य सनातन (नवीन) आणि प्राचीन  आहे, शरीर मारला गेला तरी हा मारला जात नाही." ।।20।।

        "हे पार्थ! जो पुरूष, हा आत्मा नाशरहित, नित्य, अव्यय आणि अविनाशी जाणतो ,तो कोणाला कसा मारणार ? किंवा कोण कसा त्याला(आत्मेला) मारणार ?" ।1211।

        "ज्याप्रमाणे माणूस जुनी वस्त्रे टाकून देऊन दुसरी नवीन वस्त्रे धारण करतो, त्याचप्रमाणे जीवात्मा जुने शरीर टाकून दुसरे नवीन शरीर धारण करतो." ।।221।

        "या आत्म्याला शस्त्र कापू शक्‍त नाही, अग्नि जाळू शकत नाही, पाणी भिजवू शकत नाही, आणि वारा वाळवू शकत नाही."।।23।।

         "हा जीवात्मा अविभक्त, न जाळणारा, भिजवता न येणारा आणि वाळवता न येणारा आहे. तसेच हा आत्मा नित्य (सदैव राहणारा) , सर्वव्यापी, अचल, स्थिर राहणारा आणि सनातन आहे." ।1241।।

        "हा आत्मा अव्यक्त आहे ,अचिंत्य (मनानेहिं जाणणे अशक्य) आहे आणि विकाररहित (कुठल्याहि दोषाची उपाधी नाही ) व अत्यंत शुध्द आहे असे म्हटले जाते, म्हणुन हे आना ! हा आत्मा वर सांगितल्या प्रमाणे आहे , हे लक्षात घेऊन तू शोक करणं योग्य नाही." ।1251।

        "अथवा हा आत्मा (शरीराबरोबर) नेहमी जन्मतो किंवा नेहमी मरतो, असे जर तू मानत असशील तरी सुधा हे महाबाहो मग तर शोक करणे उचित नाही ,।।26।। 

        कारण जो जन्म घेतो त्याचा मृत्यु निश्चित आहे आणि ज्याचा मृत्यु झाला आहे त्याचा जन्म निश्चित आहे, म्हणून अपरिहार्य (तुझ्या वरील मता प्रमाणेंहि) शोक करणे उचित नाहीं."1॥12711


        "सर्वभूते (जीव) आरंभी व जन्मापूर्वी अव्यक्त (अप्रकट) आणि मृत्यु नंतर ही अव्यक्त‍ (अप्रकट) असतात, फक्त (जन्म आणि मृत्युच्या) मध्ये प्रकट (दिसत) असतात, मग अशा स्थितीत शोक कसल करायच ?" ।।281।

        "एखादा महापुरूष या आमल्म्याला आश्चर्य प्रमाणे पाहतो ,तसेच दुसरे तत्वाने आर्श्वर्य प्रमाणे वर्णन करतो, आणखी एखादा अधिकारी पुरूष याच्याविषयी आश्चर्य प्रमाणे ऐकतो आणि कोणी कोणी तर ऐकूनही याला जाणत नाहीत." ।।29।।

        "हे अर्जुना! हा आत्मा सर्वांच्या शरीरात नेहमीच अवध्य (वधन होणारा) असतो, म्हणून सर्व प्राण्यांच्या बाबतीत तूला शोक करणें योग्य नाही. ।।301। 

        तसेच स्वत:च्या धर्म लक्षात घेऊन तू भिता कामा नये. कारण क्षत्रियाला ,स्वधर्म युद्धा पेक्षा दुसरें कोणतेहि कल्याणकारक कर्तव्य कर्म नाही "।131।।

        "हे पार्थ ! सहजपणे समोर आलेले व उघडलेले स्वर्गाचे दारच असे हे युध्द भाग्यवान क्षत्रियांना लाभतो,।।321।

          परंतु जर तू हे धर्मानीयुक्‍त युध्द केलेस नाही तर स्वधर्म आणि कीर्ती गमावून पापाला जवळ करशील, ।1331। 

        तसेच सर्व लोक तुझी चिरकाळ अपकीर्ति सांगत राहतील आणि सन्मानित पुरूषाला दुष्कीर्ति मरणापेक्षा अधिक त्रासदायक (जीवंत मरण) आहे "।1341।

        "दुर्योधने सोबत दुसरे महारथी सर्व तुला “भिऊन युध्दातून पळून जाणारा” समजतील आणि ज्याचा जवळ तू आदि जास्त वेळ अतिशय आदरणीय होतास, अता ते पण तुला तुच्छ मानतील." ।।351।

        "तुझे शत्रु तुझ्या सामर्थयाची निंदा करीत तुला पुष्कळ नको नको ते बोलतील , याहून अधिक दुखदायक काय असणार आहे?" ।1361।

        "अरे रणात विजयी झालास तर पृथ्वीचे राज्य भोगशील हे तर निश्चितच, मरण पावलास तर स्वर्ग (सुख)प्राप्त करशील, अत: कृतसंकल्प होऊन युध्दासाठी उभा हो."।।371।

         जय-पराजय ,लाभ-हानि आणि सुख-दुखाला समान मानून युध्द कर.असे केलें म्हणजे तुला (कोणतेच) पाप लागणार नाही." ।1381।


।।बुद्धी या भक्तियोग ।।

        "हे पार्थ ! हा विचार तुला सांख्य (आत्मज्ञान) योगाच्या संदर्भात सांगितला , आणि आता  बुध्दी (भक्ति) योगा विषयी ज्ञान ऐकू ,कारण या बुध्दीने युक्‍त झाला असता तू (संसार) कर्मबंधनातून कायमचा मुक्‍त होशील." ।1391।

        "या भक्तियोगात केलेला प्रयास विफल होत नाही आणि उलट केल्यास फलस्वरूप दोषही लागत नाही, या धर्माचा पुष्कळ आचरण जन्म-मृत्युरूपी मोठ्या भयापासून रक्षण करतो." ।।401।

        "हे अर्जुना ! या कर्म(भक्‍्ति) योगात निश्चयात्मक बुद्धि एकच ,परन्तु अस्थिर असणारा अविचारी, कामनायुक्त माणसांच्या बुध्दी खात्रीने पुष्कळ फाटे फुटलेल्या व वृक्षाच्या असंख्य शाखाप्रमाणे असतात."।1411।

        " हे अर्जुना ! मूर्ख लोग वेदांचे अर्थवाक्य विषय फलस्वरूप मधुपुष्पित वाक्यांना प्रकृष्ट बेदवाक्य म्हणतात, असे वेद अर्थांमध्ये रत ते परमात्म तत्वाला मानत नाही, ।।421। 

        अत: काम भोगानी दुषित त्यांचे मन ,व स्वर्ग प्राप्तीचे इच्छीत पुरूष , भोग आणि ऐश्वर्या देणारे साधनस्वरूप (पुन: पुन:) जन्मरूपी कर्मफलांमध्ये बांधणारी अनेक प्रकाराच्या (वेद वर्णित) क्रियांणाच ते वेद वाक्य म्हणतात." ।।431।

        "त्या मधुपुष्पित वाक्यांणी ज्यांचे अंतकरण व मन आकृष्ट करून घेतले आहे आणि जे प्राप्त झालेले भोग आणि ऐश्वर्यात जे अत्यंत आसक्त आहेत ,अशा पुरूषांची परमात्मा विषयणी निश्चयी(एकाग्र) बुध्दी असत नाही. वेदांमध्ये प्रकृतीचे तीन गुणांच्या विषयांचे वर्णन आहे."| 14411

        "हे अर्जुना! वेद( सत्व, रज व तम गुण) वर सांगितल्याप्रमाणे तिन्ही गुणांचा पूर्णपणे त्याग करूण निर्गुण (परमात्म) तत्वामध्ये प्रतिष्ठित हो. तू सर्व द्ृन्द्वांनी( मान अपमानादि) रहित होऊन योगक्षेम (धन-धाण्यादि) ची इच्छा न ठेवता , माझे सांगितले प्रमाणे बुध्दी (भक्ति) योगा द्वारा माझ्या नित्यस्वरूपात प्रतिष्ठित हो,"।।451। 

        "जसे लहाण जलाशयानी जेवढा गरजा पूर्ण होतात, तेवढा गरजा मोठ्या जलाशयाणी सहज (त्रास न होता) पूर्ण होतात. तसेच वेदवर्णित देवोपासना करून जी फले प्राप्त होतात, ते फल वेदज्ञ भक्तियुक्‍्त ब्राह्मणगण (भगवद्‌ कृष्ण उपासना करून) सहजच प्राप्त करून घेतात."।।461।

        "तुला स्वत:चे शास्त्रधर्म युक्‍त कर्म करण्याचे अधिकार आहे. पण त्यांचे फलांवर कधीही  नाही, म्हणुन तू कर्मफलांची इच्छा करणारा व त्यांचे भोगांमध्ये आसक्त होणारा होऊ नकोस ,तसेच कर्म न करण्याचाही आग्रह धरू नको ."|।471।

        "हे धनंजया ! तू आसक्ति सोडून तसेच सिद्धि आणि असिध्दि मध्ये समान भाव ठेवून योगात स्थिर होऊन कर्तव्य कर्म कर, यालाच समतत्व योग म्हटले आहे."। ।48।।

        "या समतत्व बुध्दियोगा पेक्षा सकाम कर्म अत्यंत तुच्छ (पुन: जन्म देणारे) आहे, म्हणुन हे धनंजया ! तू समबुध्दिच्या रक्षणाचा उपाय शोध (बुध्दियोगाचे आश्रय घे) ,कारण फलांची इच्छा बाळगणारे पुरूष अत्यंत दीन होतात."।।49।।

        "समबुध्दि असणारे पुरूष पाप व पुण्य या दोन्हींचा याच जगात त्याग करतो, अर्थात त्यापासुन मुक्‍त असतो , म्हणुन तू समत्वरूप योगाला चिकटून राहा, कारण हाच कर्मबंधनातून कायमचा सुटण्याचा उपाय आहे, ।1501।  

        कारण समबुध्दिने युक्‍त असलेले ज्ञानी लोक कर्मांपासुन उत्पन्न होणारे फळांचा त्याग करून जन्मरूप बंधनापासुन मुक्‍त होऊन (जर फळच नाही तर ते भोगाला पुन: जन्म न घेत) निर्विकार परमपदाला प्राप्त होतात."  |।51।।

        "जेव्हा तुझी बुद्धि मोहरूपी चिखलाला पूर्णपणे पार करून जाईल, तेव्हा तू ऐकलेल्या व ऐकण्यासारखे इह-परलोकातील सर्व भोगांपासून तू विरक्त होशील."।।521।

        "तेच तेच वैदिक वचने ऐकून विचलित झालेली तुझी बुद्धि जेव्हा परमात्म्यात अचलपणे स्थिर होईल ,तेव्हा तू योगफल प्राप्त करशील म्हणजेच परमात्म्याशी नित्य संयोग होईल."।1531।

        

।स्थिरबुध्दिचे लक्षण।।


अर्जुनाने विचारले,

        "हे केशवा ! जो समाधीत परमात्म्याला प्राप्त झालेला आहे ,अशा स्थिर बुद्धि पुरूषांचे काय लक्षण आहे ? तो स्थिरबुद्धि पुरूष कसा बसतो, आणि कसा चालतो? "|1541।

श्रीभगवान म्हणाले,

        "हे अर्जुना ! ज्या वेळी हा पुरूष मनांतील सर्वकामना पूर्णपणे टाकून देतो आणि निग्रह केलेल्या (संयमित) मनानी आनंदस्वरूप आम्म्येच्या द्वारा संतुष्ट राहतो, त्याला स्थितप्रज्ञ म्हंटला जातो,  ।1551। 

        दुख:दायक प्रसंगी ज्यांचे मनाला खेद वाटत नाही ,सुखांच्या प्राप्ती विषयी ज्याला मुळीच इच्छा नाही ,तसेच ज्यांचे प्रीति (आवडी-निवडी), भय व क्रोध नाहीसे झाले आहेत , असा मुनी स्थिरबुद्धि(प्रज्ञ) म्हटला जातो." ।1561।


        "जो पुरूष सर्व बाततीत मोहशुन्य ,शुभ-अशुभ गोष्टी घडल्या असता प्रसन्न होत नाही किंवा त्यांचा द्वेष सुधा करत नाही, त्यांची बुध्दी स्थिर झाली असे समज."।1571।

        "कासव ज्याप्रमाणे सर्व बाजूंनी आपले अव्यय इच्छाप्रमाणे आत ओढून घेतो , त्याच -प्रमाणे जेव्हा पुरूष इन्द्रियांच्या विषयांपासून आपले इंद्रियांना सर्व प्रकारे आवरून घेतो , तेव्हा त्याची बुध्दी स्थिर झाली, असे समजावे." ।1581।

        "(इंद्रियांचे द्वारा) विषय भोग घेणारे पुरुषांचे केवळ विषयच दूर होतात ,परंतु त्याच्या विषयां बदल जे आवड व राग आहेत ते नाहीशी होत नाही, परन्तु स्थितप्रज्ञ पुरूषांची आसक्ति सुधा परमाल्म्याचे साक्षात्काराने पूर्णपणे निवृत्त होतात." 1591 ।

        "हे अर्जुना ! आसक्ति नाहीशी न झाल्यामुळे ही क्षोभ उत्पन्न करणारी इन्द्रिये प्रयत्न करीत असलेल्या बुध्दिमान पुरूषांच्या मनाला सुधा बल-जबरी ने आपल्याकडे ओढून घेतात, ।1601।

         म्हणून साधकाने त्या सर्व इन्द्रियांवर ताबेत ठेवून, वर प्रमाणे चित्त स्थिर करून, मनाला माझेच आधार देऊन ध्यानात बसावे. कारण इन्द्रिये ज्या पुरूषांच्या ताब्यात असतात, त्यांची बुध्दी स्थित आहे."।।61।।

        "विषयांचे निरंतर चिंतन करणारा पुरूषांची त्या विषयात आसक्ति निर्माण होते. आसक्ती मुळे त्या विषयांबद्दल कामना उत्पन्न होतात आणि कामना पूर्ण झाल्या नाही की क्रोध येतो."।।62।।

        "क्रोधामुळे मूढता उत्पन्न होते. मूढते मुळे स्मरणशक्ती भ्रष्ट होते. स्मरणशक्ति भ्रष्ट झाली की बुद्धि (ज्ञानशक्तिचा) नाश होतो आणि बुद्धिचा नाश झाल्यामुळे माणसाचा अध:पात (पापी) होतो."।।631।

        "(परंतु अन्त:करण माझ्या ताब्यात ठेवलेला) संयमित पुरूष आपल्या ताब्यात ठेवलेल्या राग-द्वेषादि रहित इन्ट्रियांचे द्वारा विषयांचा उपभोग घेत असून हीं तो अन्त: करण्याची प्रसन्नता प्राप्त  करून घेतो."|।641।।

        "अंत:करण प्रसन्न असल्यामुळे त्याची सर्व दु:खे नाहीशी होतात आणि त्या प्रसन्नचित्त असलेल्या कर्मयोग्यांची बुद्धि तत्काल सर्व गोष्टीन पासून निवृत्त होऊन परमात्मामध्ये उत्तम प्रकारे स्थिर होते."।|65।।

        "मन आणि इन्द्रियांला न जिंकणारा अयुक्त पुरूषाच्या ठिकाणी निश्यात्मक बुद्धि (ऐकाग्र) नसते म्हणजे मनाला अन्त:करणाचा आसक्ति भाव नसतो . असे भावनाशुन्य माणसाला शांती सुद्धा मिळत नाही. मग शांती नसलेल्या माणसाला सुख कोठून मिळणार? ।।661।

         कारण ज्याप्रमाणे पाण्यात चालणारे नौकेला वारा आपले दिशेने वाहून घेतो , तसेच विषय सुखात राहणारी इन्द्रिया विवेकी (मोक्ष इच्छित) पूरूषांची बुध्दिला सुद्धा जबरदस्तीने हिरावून घेते." ।।67।।

        "म्हणून हे महाबाहो ! ज्यांची इंद्रियें सर्वप्रकारे इन्द्रियांच्या विषयांपासून आवरून घेतलेली असतात, त्यांचीच बुद्धि स्थिर असते."।।168।।

        "सर्व प्राण्यांच्या दुष्टीने जी रात्रीसारखी असते , अशा नित्य ज्ञानस्वरूप परमानन्दाच्या प्राप्तीत स्थितप्रज्ञ योगी जागा असतो आणि ज्या नांशिवंत सांसारिक सुखाच्या प्राप्तीत सर्व प्राणी जागतात, ती परमात्मतत्व जाणणारे मुनीला ते रात्रीसारखी असते." ।।169।।

        "ज्याप्रमाणे निरनिराळ्या नद्यांचे पानी , स्थिर असलेल्या समुद्राला विचलित न करता समावून जाते. त्याच प्रमाणे सर्व भोग स्थितप्रज्ञ पुरूषांमध्ये कोणत्याहि प्रकारे विकार उत्पन्न न करता समावून जातात, त्यालाच परम शान्ती प्राप्त होते ,भोगांची इच्छा करणारा नव्हे.।1701।

        जो पुरूष सर्व काम व आसक्ति सोडून, ममता , अहंकार आणि इच्छा टाकून राहत असतो, त्यालाच (मनाची) शान्ती मिळते ।|॥711।

         "हे अर्जुना ! ब्रह्मपविचार शुन्य) स्थिती प्राप्त झालेल्या पुरूषांची सुधा हीच (शान्त) स्थिती आहे. ही स्थिती प्राप्त झाल्या नंतर योगी कधीही मोहित होत नाही आणि अंत (मृत्युच्या) वेळी या ब्रह्ममध्ये स्थिर होऊन तो ब्रह्मानंद (मोक्ष) मिळवतो." ।।721।


मूळ दुसऱ्या अध्यायाची समाप्ती 

(..............................“नित्य ॐ नमो भगवते वासुदेवाय मंत्र लिहा धंन,संपत्ति आणि मोक्ष मिळवा”----------------- )

👇🏻

श्रीमद्भागवत गीता | अध्याय ३ ( कर्मयोग ) | Srimadbhagavata Gita | Adhyay 3 (KarmYog) maulimajhi-blogger







Maulimajhi-blogger


धन्यवाद !



Copyright by :DeviAnaghaBraja Beats

Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for "fair use" for purposes such as criticism, commenting, news reporting, teaching, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balance in favour of fair use.